Wednesday, May 25, 2011

>>प्रेम..

प्रेम हे नेहमीच खर असत ,
भावना नेहमीच शुद्ध असतात ....

हवं तर विचार तुझ्या मनाला ,
एकांतात समजावेल ते तुला ....

व्याकुळ मन कधी फार भावूक होतं ,
निव्डूंगावरच प्रेम करायला धजावत ...

भावनांचा कधी उद्रेक होतो ,
समुद्र गिळून टाकावसा वाटतो...

मौनातून माझ्या आक्रोश प्रकटतो ,
मात्र माझा मलाच ऐकू येतो....

आभाळ भरून आले कि मनही भरून येत ,
सरींच्या आधी मनच कोसळत....

कधी आठवांच्या सरीमध्ये तुही न्हावून जाशील,
चिंब भिजून निश्चितच मला येवून बिलगशील ....

वादळ उठत राहतील ,पाऊस कोसळत राहील ,
तरी प्रीत मात्र आपली सदा तेवत राहील .......
राजेश रेलकर (११/०५/२०११)

No comments:

Post a Comment