गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंना वेळ नाही थांबायला,
उगाच शोधत बसतो मी त्यांच्या उगमाना ......
थांबलेले क्षण पुनः पुनः समोर उभे ठाकतात ,
पुढे गेलेल्या अश्रूंना उगमाकडे ओढतात ....
श्रावण सरीत पुनः तिची आठवण झाली ,
सगळी माझी सुखं ती केव्हाच घेवून गेली ....
तिलाही माझी आठवण येत असेल का कधी ?
निरोप खुशालीचा पाठवावासा वाटत नसेल का कधी ?....
आठवणींच्या गाठी घट्ट अश्या पडल्या ,
उसवता उसवता काळीज फाडून गेल्या .....
दिवसावर दिवस अन वर्षावर वर्ष निघून गेली ,
अबोल माझी प्रीत आठवांचा थर रचून गेली ......
काळजाला झालेल्या जखमा ताज्या अजून वाटतात ,
सहानभूती साठी आतुरतेने वाट तुझी पाहतात ....
तू येशील नक्की विश्वास आहे भाबड्या मनाला ,
येशील तेव्हा पंचारती घेवून सर्व उभे राहतील स्वागताला .......
उगाच शोधत बसतो मी त्यांच्या उगमाना ......
थांबलेले क्षण पुनः पुनः समोर उभे ठाकतात ,
पुढे गेलेल्या अश्रूंना उगमाकडे ओढतात ....
श्रावण सरीत पुनः तिची आठवण झाली ,
सगळी माझी सुखं ती केव्हाच घेवून गेली ....
तिलाही माझी आठवण येत असेल का कधी ?
निरोप खुशालीचा पाठवावासा वाटत नसेल का कधी ?....
आठवणींच्या गाठी घट्ट अश्या पडल्या ,
उसवता उसवता काळीज फाडून गेल्या .....
दिवसावर दिवस अन वर्षावर वर्ष निघून गेली ,
अबोल माझी प्रीत आठवांचा थर रचून गेली ......
काळजाला झालेल्या जखमा ताज्या अजून वाटतात ,
सहानभूती साठी आतुरतेने वाट तुझी पाहतात ....
तू येशील नक्की विश्वास आहे भाबड्या मनाला ,
येशील तेव्हा पंचारती घेवून सर्व उभे राहतील स्वागताला .......
राजेश रेलकर (01/08/2011)